काही दिवसापूर्वी "संतोष" गाठ पडला होता.फार थकल्यासारखा दिसत होता.त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विचारलं आता गाणं म्हणतोस का रे ?
हसला आणि म्हणाला कसला अरे!! आता नोकरीच्या ,संसाराच्या सगळ्या जबाबदरीत गेला सगळं नाद !!
पुण्यात मी आल्यावर कर्वे नगरला पहिली रूम केली केली तेव्हा तो रूममेट होता,सगळे बारामतीचे आणि मी एकटा बाहेरचा ,पंढरपूरचा पण गेलो मिसळून त्यांच्यामध्ये लगेच !!
संतोष बऱ्याच मुलांसारखा स्ट्रगलर, त्याला गायक व्हायचं होतं .छांन होता आवाज त्याचा,कायम रूम मध्ये किशोरची गाणी टेपवर चालू असायची आणि त्या गाण्यांच्या साथीला याचा आवाज एकत्र ! याच्याशी गाण्याबद्दल कोणाच बोलत नसायचं पण मला आवडलं होता त्याचं गाणं म्हणून मी त्याचं कौतुक केला होता .झाल !! साहेब दररोज मला एक गाणं पूर्ण म्हणून दाखवायचे !
त्यावेळेस स्तूदिओ मध्ये म्हणे आयत्या सौंडत्र्यक वर गाणी म्हणयचा नवीन प्रकार आला होता.हौशी गायक त्यावर रेकोर्डिंग करून घ्यायचे ! संतोषने हि अशी बरीच गाणे करून घेताले होते आणि तीच गाणी तो टेप वर लावी.नंतर नंतर मलाच याचा भयंकर कंटाळा येऊ लागला होता .पण याचा आत्मविश्वास प्रचंड मला म्हणायचा एक दिवशी आपण पण किशोर सारखं होणार बघ तू ! कुठ कुठ ऑर्केस्ट्रा ला भेट देऊन यायचाआणि एक तरी गाणं स्टेज वर म्हणता यावा म्हणून प्रयत्न करायचा!!
मध्ये दहा वर्षाचा काळ गेलाय आणि आता तो गाठ पडल्यावर लक्षत पहिली गोष्ट आली ती कि त्याच गाण्याच स्वप्नं फार मागे सोडून आलाय तो आणि कुठे तरी नोकरी करतो आहे!असे बरेच संतोष आपल्याला अवतिभवती सापडतील ज्यांनी सुरुवातीला खूप स्वप्न बघितली होती खूप काही वेगवेगळा करयचा होता पण रोजी रोटी आणि इतर अडचणीशी लढत स्वप्नाचा ध्यास सोडून नकळत कधीच सुटून जातो.
मनात प्रश्न येतो कि बरेच जण फक्त प्रयत्न कमी पडल्यामुळे मागे पडतात कि आजूबाजूचा वातावरण त्या वेळेस ची परिस्थिती आणि "नशिब" नावाची काही गोष्ट खरच कारणीभूत ठरती !
हसला आणि म्हणाला कसला अरे!! आता नोकरीच्या ,संसाराच्या सगळ्या जबाबदरीत गेला सगळं नाद !!
पुण्यात मी आल्यावर कर्वे नगरला पहिली रूम केली केली तेव्हा तो रूममेट होता,सगळे बारामतीचे आणि मी एकटा बाहेरचा ,पंढरपूरचा पण गेलो मिसळून त्यांच्यामध्ये लगेच !!
संतोष बऱ्याच मुलांसारखा स्ट्रगलर, त्याला गायक व्हायचं होतं .छांन होता आवाज त्याचा,कायम रूम मध्ये किशोरची गाणी टेपवर चालू असायची आणि त्या गाण्यांच्या साथीला याचा आवाज एकत्र ! याच्याशी गाण्याबद्दल कोणाच बोलत नसायचं पण मला आवडलं होता त्याचं गाणं म्हणून मी त्याचं कौतुक केला होता .झाल !! साहेब दररोज मला एक गाणं पूर्ण म्हणून दाखवायचे !
त्यावेळेस स्तूदिओ मध्ये म्हणे आयत्या सौंडत्र्यक वर गाणी म्हणयचा नवीन प्रकार आला होता.हौशी गायक त्यावर रेकोर्डिंग करून घ्यायचे ! संतोषने हि अशी बरीच गाणे करून घेताले होते आणि तीच गाणी तो टेप वर लावी.नंतर नंतर मलाच याचा भयंकर कंटाळा येऊ लागला होता .पण याचा आत्मविश्वास प्रचंड मला म्हणायचा एक दिवशी आपण पण किशोर सारखं होणार बघ तू ! कुठ कुठ ऑर्केस्ट्रा ला भेट देऊन यायचाआणि एक तरी गाणं स्टेज वर म्हणता यावा म्हणून प्रयत्न करायचा!!
मध्ये दहा वर्षाचा काळ गेलाय आणि आता तो गाठ पडल्यावर लक्षत पहिली गोष्ट आली ती कि त्याच गाण्याच स्वप्नं फार मागे सोडून आलाय तो आणि कुठे तरी नोकरी करतो आहे!असे बरेच संतोष आपल्याला अवतिभवती सापडतील ज्यांनी सुरुवातीला खूप स्वप्न बघितली होती खूप काही वेगवेगळा करयचा होता पण रोजी रोटी आणि इतर अडचणीशी लढत स्वप्नाचा ध्यास सोडून नकळत कधीच सुटून जातो.
मनात प्रश्न येतो कि बरेच जण फक्त प्रयत्न कमी पडल्यामुळे मागे पडतात कि आजूबाजूचा वातावरण त्या वेळेस ची परिस्थिती आणि "नशिब" नावाची काही गोष्ट खरच कारणीभूत ठरती !
Comments
Post a Comment